शहीदांच्या कुटुबीयांसाठी 15 वर्षे अधिवासाची अट नको; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

शहीदांच्या कुटुबीयांसाठी 15 वर्षे अधिवासाची अट नको; हायकोर्टात जनहित याचिका दाखल

सरकारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सैनिक भत्ता व इतर लाभ देताना 15 वर्षे अधिवासाची अट घालू नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे.

संरक्षण दलातील जवान केंद्र सरकारचे कर्मचारी असतात. त्यांच्या कुटुंबीयांना 15 वर्षे अधिवासाची अट लागू होत नाही. शहीद जवानाच्या कुटुंबाला महाराष्ट्रात स्थायिक व्हायचे असेल तर सरकारने त्या कुटुंबाला अधिवासाची अट न घालता सैनिक भत्ता, निवास व इतर लाभ दिले पाहिजेत. जवान देशासाठी बलिदान देतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना हक्क नाकारू शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. अलीकडेच मिंधे सरकारच्या असंवेदनशील भूमिकेमुळे मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना अडचणींना सामोरे लागले. त्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना 8 फेब्रुवारी 2007 च्या जीआरनुसार अधिवासाची सूट लागू करावी, अशी विनंती तिरोडकर यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच… मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या...
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला