ED ही खोटं बोलणारी मशीन! AAP चा हल्लाबोल, यंत्रणेकडून मात्र अटकेचा बचाव

ED ही खोटं बोलणारी मशीन! AAP चा हल्लाबोल, यंत्रणेकडून मात्र अटकेचा बचाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अटकेत आहे. सक्तवसुली संचलनालयाचे (ED) नऊ समन्स धुडकावूनल्यानंतर अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आणि उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतरच अटक करण्यात आल्याचा युक्तीवाद ED ने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की केंद्रीय तपास यंत्रणा ही फक्त भाजपच्या इशाऱ्यावर ‘खोटं बोलणारी मशीन’ आहे.

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ED ने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करणार आहे.

त्यावर आज ED नं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. सूत्रांनी सांगितलं की, ‘प्रतिज्ञापत्रात ED नं असा दावा केला आहे की नऊ वेळा समन्स जारी करूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ते चौकशी टाळत होते’, असा युक्तिवाद एजन्सीनं केला होता.

ED ने असंही म्हटलं आहे की, पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, घोटाळ्याच्या कालावधीत 36 व्यक्तींनी 170 सेलफोन बदलले आणि नष्ट केले.

यावर, ‘भाजपला अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखायचं आहे… ही ईडीची चौकशी नाही, ही भाजपची चौकशी आहे’, असं पक्षानं म्हटलं आहे.

‘आप’नं म्हटलं की, ‘ED ही भाजपच्या राजकीय मित्राप्रमाणे काम करत आहे. केजरीवाल आणि अटक केलेल्या इतर नेत्यांच्या विरोधात तपास यंत्रणेकडे पुरावे नाहीत’.

दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला होकार दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयानं, तात्काळ सुनावणीस नकार दिला आणि यंत्रणेला 26 एप्रिलपर्यंत त्याच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं.

पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त