रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई, 28 हजार 173 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई, 28 हजार 173 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 30 गावातील 99 वाड्यांमध्ये 7 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. या 30 गावातील 28 हजार 173 ग्रामस्थांना पाणी टंचाई भेडसावत आहे.

उन्हाळा सुरु होताच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. विहिरी आणि जलस्त्रोत आटल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईग्रस्त गावांना जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग टँकरने पाणी पुरवठा करतो. सध्या 30 गावातील 99 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील 158 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. दापोली तालुक्यातील 2 गावातील 2 वाड्यांमध्ये 888 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

खेड तालुक्यातील 6 गावातील 21 वाड्यांमधील 3 हजार 511 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. हा शासकीय टँकर 26 फेऱ्या मारत आहे. चिपळूण तालुक्यातील 13 गावातील 29 वाड्यामधील 9 हजार 547 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. हा टँकर 16 फेऱ्या मारत आहे. संगमेश्वर तालुक्यामधील एका गावातील 4 वाड्यामध्ये राहणाऱ्या 384 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

रत्नागिरी तालुक्यामधील 4 गावातील 37 वाड्यांमध्ये राहणाऱ्या 13 हजार 245 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. हा टँकर 126 फेऱ्या मारत आहे. लांजा तालुक्यातील 3 गावातील 5 वाड्यांमध्ये राहणाऱ्या 440 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. राजापूर आणि गुहागर तालुक्यात अद्याप पाणीटंचाई सुरू झालेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त