गिरीश महाजन यांच्याबाबत शरद पवार यांचं सूचक विधान; म्हणाले, अडचणीचं ठरेल…

गिरीश महाजन यांच्याबाबत शरद पवार यांचं सूचक विधान; म्हणाले, अडचणीचं ठरेल…

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक विधान केलं आहे. गिरीश महाजन काय बोलतात, काय करतात हे मी बोलू इच्छित नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचं ठरेल, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. पवार यांना नेमकं काय सूचवायचं आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीत भाग घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

विरोधकांचा सुपडा साफ होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्याबाबत तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. महाजन काय बोलतात आणि करतात यावर मी भाष्य करू इच्छित नाही. ते फार अडचणीचं असेल. त्यामुळे मी भाष्य करू इच्छित नाही. व्यक्तीगत कुणासंबंधात मी उत्तर देऊ इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.

म्हणून निर्णय घ्यावा लागला

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. एखाद्याला वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी असं कधी होत नव्हतं. त्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित खडसेंनाही त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना काही निर्णय घ्यावा लागला. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला असेल, असं शरद पवार म्हणाले.

राजीनाम्याचं माहीत नाही

एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला का? असा सवाल केला असता पवार यांनी थेट भाष्य करणं टाळलं. त्यांचा राजीनामा आला की नाही माहीत नाही. कारण मी संघटनेचं काम पाहत नाही. त्यावर जयंत पाटीलच सांगू शकतील, असं पवार म्हणाले. या भागात जे लोक प्रभावीपणे काम करतात त्यापैकी खडसे एक होते. पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेससह आमच्याकडे मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुणाचीही आम्ही उणीव भरून काढू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदींनी जुमलेबाजी आणली

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राजकारणात जुमलेबाजी आणण्याचं काम मोदींनी केलं. देशाला पुढे कसं नेणार आणि आजचे प्रश्न कोणते यावर ते बोलत नाहीत. मी नेहरूपासून ते सर्व पंतप्रधानांच्या सभा ऐकल्या आहेत. राष्ट्र, विकास आणि त्याबाबतची आखणी त्यावर ते बोलायचे. पण मोदी त्यावर काहीच बोलत नाही. ते फक्त टीका करतात. आणि व्यक्तिगत हमले करतात. काँग्रेसवर बोलत असतात. पण भविष्यात देशाचा विकास कसा करणार, वाटचाल कशी असेल यावर बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;