देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा… उद्धव ठाकरे खवळले; ‘त्या’ मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल

देवेंद्रजी, जनाची नाही तर मनाची ठेवा… उद्धव ठाकरे खवळले; ‘त्या’ मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा. ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. त्याच खोलीबाहेर तुम्हाला अमित शाहने उभं केलं होतं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज अँटॉप हिल येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.

आदित्यला मुख्यमंत्री करतो

मी मुलाखत दिली होती. त्यात बाळासाहेबांच्या खोलीत बसून बोलणं झालं होतं असं म्हटलं होतं. मी देवदेवतांची शपथ घेऊन बोललो. यांनी 2014 ला आणि 2019 आपला विश्वास घात केला. आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. त्यानंतर आपण त्याला मुख्यमंत्री करू असं मला फडणवीस म्हणाले होते. मी म्हटलं अहो असं करू नका. आधी त्याला आमदार करू. मी त्यांना म्हटलं अहो असं नको. त्यावर फडणवीस म्हणाले मी वरती जाणार आहे. म्हणजे केंद्रात जाणार आहे. त्यामुळे आदित्यला तयार करून मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हटल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

ती बाळासाहेबांची खोली होती

उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असल्याचं आज म्हणत आहेत. अहो देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. म्हणाले, कोणत्या तरी खोलीत घेऊन गेले. देवेंद्रजी ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. ज्या खोलीबाहेर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाहेर थांबायला सांगितलं होतं, असा हल्लाबोल त्यांनी केला.

सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलीच

आजची सभा प्रचारासाठी नाही, तर विजयासाठी आहे. लढत कुणामध्ये होणार हे सांगायचं तर ज्याने आपल्या आईवर वार केले त्याच्याशी आहे. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, तो तुमचा काय होणार? त्याने आता काहीही देऊ द्या. श्रीखंड देईल, दूध देईल, त्याने काहीही देऊ द्या. आपलं सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलंच आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना नाव न घेता दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;