छोटे मनसे कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई… उन्मेष पाटलांची जोरदार शेरोशायरी; भाजपवर साधला निशाणा

छोटे मनसे कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई… उन्मेष पाटलांची जोरदार शेरोशायरी; भाजपवर साधला निशाणा

भाजपमधून ठाकरे गटात आलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उन्मेष पाटील यांनी शेरोशायरी करत भाजपला खडेबोल सुनावतानाच अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ऐकवत जोरदार हल्ला चढवला आहे. छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचे वाक्य होतं. भाजपमध्ये आता छोटं मन राहिलं आहे. छोट्या मनाने जे राजकारण करतात ते अत्यल्प काळासाठी असतं. दीर्घकाळ राजकारण करण्यासाठी मोठे मन लागतं, असा हल्लाच उन्मेष पाटील यांनी लगावला आहे.

जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील आणि शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव देशमुख चाळीसगावात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. एकेकाळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे आज करण पवार यांच्यासाठी एकत्र प्रचार करताना दिसून येत आहे. यावेळी उन्मेष पाटील यांनी आपल्या खणखणीत भाषणातून भाजवर जोरदार निशाणा साधला आहे.

कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा

उद्धव ठाकरे यांच्यासारखा निर्मळ, निष्कलंक मुख्यमंत्री होणे नाही हे महाराष्ट्रातील 39 टक्के लोकांचं म्हणणं आहे. म्हणून मी ठरवलं कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा. राजकारणात मनाने मोठे असले पाहिजे. म्हणून मशाल हातात घेऊन मी आणि करण पवारांनी ही भूमिका घेतली आहे, असं उन्मेष पाटील म्हणाले.

क्रांती करण्याची वेळ आलीय

राजकारणात सध्या इंग्रजांची नीती अवलंबली जात आहे. राजकारणात नेहमी माणसं तोडली जातात. मन तोडली जातात. पण एका सकारात्मक राजकारणाची चाहूल आपण चाळीसगावमध्ये बघत आहोत. जळगाव लोकसभेवर करण पवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत आहेत. आता मशालीने क्रांती करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

टायगर अभी जिंदा है

टायगर अभी जिंदा है, फिर वही दिल लाया हूँ… अशी शेरोशायरीही त्यांनी केली. आपल्याला गरुड झेप घ्यायची आहे. आमदार म्हणजे आम लोकांसाठी दारात जाऊन सेवा करणारं पद आहे. दुर्दैवाने आपले आमदार जमिनीवर नसून लोकांच्या जमिनी घेत सुटले आहेत. लोकप्रतिनिधी हा संवेदनशील असला पाहिजे, लोकांच्या सुखदुःखात कामा येणार असला पाहिजे. अटलजींची भाजप म्हणतात परंतु त्यांचं वाक्य विसरून गेले आहेत. छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता… हे अटलजींचं वाक्य होतं. भाजपला आज त्याचाच विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;