Aaditya Thackeay : संविधान बदलण्याच्या विषयावर आदित्य ठाकरे म्हणाले….

Aaditya Thackeay : संविधान बदलण्याच्या विषयावर आदित्य ठाकरे म्हणाले….

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने संविधानाला मुद्दा बनवलं आहे. भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास देशाच संविधान बदलणार असा प्रचार इंडिया आघाडीकडून केला जातोय. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं. आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संविधान बदलण्याच्या मुद्यावर भाष्य केलं. लातूरमध्ये आलेले आदित्य ठाकेर म्हणाले की, ‘भाजपाला संविधान कशासाठी बदलायच आहे?’ असा सवाल त्यांनी केला.

“भाजपाचे मोठे नेते पंकजा मुंडेंपासून 400 पारचा नारा देतायत. ते असं का बोलतायत? 400 पार का करायचय? संविधान बदलायचय म्हणून. संविधान का बदलता? आपण वेगवेगळे कायदे करत असतो, संविधान बदलण देशासाठी धोकादायक आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “गुंड सध्या मंत्रालयात जाऊन रील बनवतात. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

संविधान बदलण्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय म्हणालेले?

भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल पत्रकार परिषदेत संविधान बदलण्याच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचार केला नाही”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;