मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक, जगमोहन रेड्डी जखमी; कपाळाला टाकेच पडले

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक, जगमोहन रेड्डी जखमी; कपाळाला टाकेच पडले

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा रोड शो सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दिशेनेच दगड भिरकावण्यात आले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाही या दगडाचा मारा बसला आहे. त्यांच्या कपाळावर दगड येऊन आदळल्याने कपाळाला खोच पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र, दगडफेकीच्या घटनेमुळे आंध्रप्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

विजयवाडाच्या सिंह नगरमध्ये जगन मोहन रेड्डी यांचा बसमधून रोड शो सुरू होता. त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला लागला आहे. अगदी डोळ्याच्यावर भुवयांजवळ दगड लागल्याने मोठी खोच पडली. मुख्यमंत्री जखमी होताच बसमध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जगन मोहन रेड्डी यांनी पुन्हा निवडणूक प्रचार सुरू केला.

दोन टाके पडले

वायएसआर काँग्रेस पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच जोर पकडला आहे. त्यांनी राज्यात वुई आर रेडी हे कँम्पेन सुरू केलं आहे. बसमधून ही मोहीम राबवली जात आहे. त्यानिमित्ताने स्वत: जगन मोहन रेड्डीही या कॅम्पेनमध्ये सहभागी झाले होते. उघडया बसमधून त्यांचं कॅम्पेन सुरू होतं. पण इतक्यात कोणी तरी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. यातील एक दगड मुख्यमंत्र्यांच्या कपाळाला भुवयांच्या जवळ लागला. त्यामुळे खोच पडली. यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यांच्या कपाळाला दोन टाके मारण्यात आले आहेत. सुदैवाने या हल्ल्यातून मुख्यमंत्र्यांचा डोळा थोडक्यात बचावला आहे.

शाळेजवळून दगड फेकला

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दगडफेक शाळेच्या जवळून झाली आहे. ही शाळा रॅली निघाली त्याच्या बाजूलाच होती. दरम्यान, वायएसआरसीपीच्या एका सदस्याने तर या मागे टीडीपी आघाडीचा हात असल्याचा आरोप केला आहे. टीडीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू घाबरल्याचं या कृत्यातून दिसून येतं असं या सदस्याने म्हटलं आहे.

’13 मे रोजी मतदान

दरम्यान, आंध्रपदेशातील विधानसभेच्या 175 आणि लोकसभेच्या 25 जागांसाठी मतदान होत आहे. येत्या 13 मे रोजी या दोन्ही निवडणुकीसाठी आंध्रप्रदेशात मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीने 151 जागा आणि लोकसभेच्या 22 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी राज्यात टीडीपी, भाजप आणि जन सेनेची आघाडी झाली आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान असल्याचं सांगितलं जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;