मुंबईतील जागांचा तिढा पोहचला दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना

मुंबईतील जागांचा तिढा पोहचला दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना

महाविकासआघाडीत मुंबईतील जागांवरुन तिढा सुरु असताना वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो नंतर सुटला. पण असं असलं तरी अजून काही जागांवरुन तिढा कायम आहे.

मुंबईतील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे. मुंबईत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत. काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा आम्हाला मिळाली तर आम्ही विजय मिळवून दाखवू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईत ठाकरे गटाला ४ जागा तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं अद्याप आपला उमेदवार दिलेला नाहीये.

काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी उत्तर मुंबईची जागा मिळाण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील हायकमांडसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे त्या आज दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

उत्तर मुंबईतून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण पियूष गोयलांविरोधात काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार नसल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे येथे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;