सो जा बच्चे, नहीं तो गब्बर आएगा… इतका डेंजर चेहरा देशात; संजय राऊत यांचा कुणावर हल्लाबोल?

सो जा बच्चे, नहीं तो गब्बर आएगा… इतका डेंजर चेहरा देशात; संजय राऊत यांचा कुणावर हल्लाबोल?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींचा चेहरा भयंकर आहे. लोक घाबरायला लागले. सो जा बच्चे, नहीं तो गब्बर आएगा… इतका डेंजर चेहरा या देशात आहे. चेहरा नव्हे ही भूताटकी आहे. हे भूत आपल्याला उतरवायचे आहे. इतके भयंकर कांड या माणसाने देशात केलं आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर लोकसभेची जागा लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत संभाजी नगरात आले होते. यावेळी त्यांनी मोदींवर हा हल्ला चढवला. त्यांनी अब की बार 400 पारचा नारा दिलाय. 400 पार? लोकशाही काय तुमच्या बापाची आहे काय? मोदी 200 जागा जिंकले तरी खूप. इंडिया आघाडी 300 पार जाणार आहे, असं सांगतानाच मोदी परत पंतप्रधान होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा हमखास जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

हा डरपोकपणा आहे

शेख मुजीबर रेहमानवर भारतात वेब सीरिज दाखवली जाते का? त्यात इंदिरा गांधी यांची शौर्यगाथा आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्या वेब सीरिजवर बंदी घातली आहे. हा डरपोकपणा आहे, अशी टीका त्यांनी केली.

मटण हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?

तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. मग तुम्ही गेल्या दहा वर्षात काय काम केलं ते सांगितलं पाहिजे. काय काम केलं हे सांगायचं सोडून विरोधक मटण खात असल्याचं ते म्हणतात. मटण कुणी कधी खायचं हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. देशाला एक नंबरचा खोटारडा पंतप्रधान देशाला मिळाला आहे. ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल. फेकू चॅम्पियनशीप. एक टीम बनवू. स्टेट लेव्हलला देवेंद्र फडणवीस आणि नॅशनल लेव्हलला नरेंद्र मोदी असतील. उप कर्णधार म्हणून अमित शाह यांना ठेवावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.

अवतारी पुरुष… मग नोकऱ्या का नाही?

अवतारी पुरुष आहे तर मग देशातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या का देत नाही? गंगेत प्रेते वाहत होती तेव्हा अवतारी पुरुष थाळ्या वाजवायला सांगत होता. भाजप हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. मला अटक केली. काय उखडलं? भगवा फडकवत गेलो. भगवा फडकवत आलो. हा देश हुकूमशाही समोर कधीच झुकला नाही. हुकूमशाहाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त 10 टक्के मतदान वाढवा. ईव्हीएम घोटाळा संपून जाईल. ईव्हीएम घोटाळा संपल्यावर मोदींचा पक्ष ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाही, असा दावाच त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;