शेतकरीच हटवणार मोदी सरकार, विश्वंभर चौधरी यांचा विश्वास

शेतकरीच हटवणार मोदी सरकार, विश्वंभर चौधरी यांचा विश्वास

सध्याच्या सरकारबाबत सामान्य लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱयांना एक रुपयाची कर्जमाफी दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही. नरेंद्र मोदी हटाव ही घोषणा आता सामान्य माणसे देत असून मोदींना हटविण्यासाठी या वेळी शेतकरी सर्वात पुढे असतील, असे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. तर सत्ताधारी नेरेटीव्ह तयार करत असून चारशे पार हे केवळ बुडबुडे असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

टिळक स्मारक मंदिर येथे काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे निर्मित आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले संपादित ‘घोर नैराश्याची 10 वर्षे? या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. असीम सरोदे, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.

उल्हास पवार म्हणाले,  डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानशी हेरगिरी केली. त्याचे पुढे काय झाले? त्यावर हे लोक बोलत नाहीत. संघाच्या संस्कारात तयार झालेल्या व्यक्ती अशी कामे करतात आणि हे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतात, असेही ते म्हणाले.

असीम सरोदे म्हणाले, बदल्यांच्या भावनेतून हे सरकार काम करते. विचारी हिंदू विरुद्ध विषारी हिंदू अशी ही लढाई आहे. देवेंद्र फडणवीस हे विषारी हिंदू आहेत. राज्यातील राजकारण हे फडणवीस यांनी नासवले असल्याची टीका त्यांनी केली.

पेटलेली मशाल त्यांना जागा दाखवून देईल!

नरेंद्र मोदी हे जाहिरातींच्या प्रेमात असलेला माणूस आहे. तामिळनाडू, केरळ या सुशिक्षित राज्यात त्यांना यश मिळविता आले नाही. महाराष्ट्र राज्यातदेखील त्यांना हे जमलेले नाही. राज्यात पेटलेली मशाल त्यांना जागा दाखवून देईल, असे ऍड. सरोदे यांनी या वेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;