…तर पंतप्रधानांसह सगळे भाजप नेते जेलमध्ये जातील, मोदींच्या टीकेला मीसा भारती यांचं प्रत्युत्तर
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी प्रचाराचं सत्र जोरदारपणे सुरू झालं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला राजद नेत्या मीसा भारती यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप केला होता. त्याला मीसा भारती यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांना निवडणूक रोख्यांवरून प्रश्नही विचारला आहेत.
पंतप्रधानांना प्रत्युत्तर देताना मीसा भारती म्हणाल्या की, इंडिया आघाडीने 30 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यातही पंतप्रधानांना तुष्टीकरण दिसत आहे. आम्ही शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न आणि किमान विक्री दर लागू करण्याबद्दल बोलतोय. त्यातही त्यांना अनुनय दिसतोय. पण, निवडणूक रोख्यांवर कोण उत्तर देणार आहे? आम्ही जर जनतेला संधी दिली तर पंतप्रधानांसह भाजपचे सगळे नेते कारागृहात जातील, अशा शब्दांत मीसा भारती यांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List