अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच…

अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच…

प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी या त्यांच्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांनी त्याकाळात आयटम नंबरही केला होता. त्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलंय. या सर्व कलाकारांचं वागणं, बोलणं चालणं आणि स्वभाव अरुणा यांना माहीत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. अमिताभ यांच्या स्वभावावरच त्यांनी बोट ठेवलं आहे.

अरुणा ईराणी यांनी राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केलंय. त्यांची राजेश खन्नासोबत चांगली मैत्री होती. पण अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत कधी चांगली बाँडिंग राहिली नाही. एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलंय. राजेश खन्ना चांगले कलाकार होते. त्यांचं आणि माझं चांगलं जमायचं. त्यांना लोक घाबरायचे. पण मी त्यांना घाबरत नव्हते. ते मला बेन म्हणायेच. ऐ बेन चल जेवण करू, वेळ झालीय, असं ते नेहमी म्हणायचे, असं अरुणा ईराणी यांनी सांगितलं.

ते आणि त्यांची खोली

यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन सुरुवातीपासूनच वेगळे राहायचे. अमिताभ सेटवर कधीच कुणाशी मिसळलेले दिसले नाहीत. ते आपल्या रूममध्ये किंवा वॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवायचे. त्यांना कुणासोबत फ्रेंडली झालेलं पाहिलं नाही, असं अरुणा ईराणी म्हणाल्या.

त्यांच्याशी कधीच मैत्री झाली नाही

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत माझी कधी मैत्री झाली नाही. पण आम्ही कधी कधी बोलायचो, असं त्या म्हणाल्या. अभिनेत्रींसोबत माझं चांगलं जमायचं. त्या मला का पसंत करायच्या हे मला माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या एका मुलाखतीत अरुणा ईराणी यांनी अमिताभ यांच्याबद्दलची एक माहिती शेअर केली होती. अमिताभ हे अत्यंत शिष्टाचार पाळणारे व्यक्ती आहे. ते कितीही बिझी असू देत ते कॉल करतात. अभिनेता म्हणून ते लिजेंड आहेत. जेव्हा मी त्यांच्यासोबत बॉम्बे टू गोवामध्ये काम केलं होतं, तेव्हा ते प्रसिद्ध नव्हते. त्यांनी आतापर्यंत एवढं प्रचंड काम केलंय. पण ते अजूनही तसेच आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार नाहीये, असं अरुणा यांनी म्हटलं होतं. मी जर अमिताभ यांच्या जागी असते तर माझ्या डोक्यात कधीच यश गेलं असतं. मला वाटतं अमिताभ यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही, असंही त्यांनी मोकळेपणाने सांगितलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;