केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये स्पर्धा नको, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये स्पर्धा नको, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कारण, अनेक राज्यांच्या सरकारांनी केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचं दिसून आलं आहे. त्यावर नाराजी व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये स्पर्धा असू नये, असं म्हटलं आहे.

कर्नाटक राज्य सरकारने केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल केली असून दुष्काळ निधी अद्याप जाहीर केला नसल्याचं म्हटलं आहे. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या याचिकेनुसार, कर्नाटक राज्याच्या अनेक जिल्ह्यांना सध्या दुष्काळाचा फटका पडला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांसाठी निधी आवश्यक असून तो केंद्राकडून अद्यापही जाहीर झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होत आहे. त्यामुळे राज्य सरकारला नाईलाजाने सर्वोच्च न्यायालयात यावं लागत आहे. तसंच, केंद्र सरकारने दुष्काळ निवारण समितीने दिलेल्या अहवालावर सहा महिने होऊनही काहीही कारवाई केलेली नाही. त्यात एनडीआरएफची मदत रोखल्यानेही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, असा युक्तिवाद कर्नाटक राज्य सरकारतर्फे करण्यात आला.

त्यावर केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांचं कारण पुढे केलं. कर्नाटक सरकारने न्यायालयात येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधायला हवा होता, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने केंद्र सरकारला या संदर्भात आदेश घेण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली. तर केंद्र आणि कर्नाटक राज्य सरकार यांनी आपापसात सहकार्य ठेवून कामं करावं. शक्यतो एकमेकांच्या विरोधात काम करू नये. केंद सरकार आणि कोणत्याही राज्य सरकारमध्ये स्पर्धा होऊ नये, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;