Lok Sabha Election 2024 : हक्क मागणाऱ्यांना सरकार इतकी वाईट वागणूक का देतेय? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Lok Sabha Election 2024 : हक्क मागणाऱ्यांना सरकार इतकी वाईट वागणूक का देतेय? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

स्वतःचे हक्क मागणाऱया शेतकऱ्यांना सरकार दहशतवादी ठरवून कारवाई करीत आहे. शिवाय लडाखवासीयांवर होणारा अन्याय आणि हिंदुस्थानचा भूभाग बळकावणाऱया चीनविरोधात 21 दिवस आंदोलन करूनही कोणतीही ठोस भूमिका न घेता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार सपशेल दुर्लक्ष करीत आहे. स्वतःचे हक्क मागणाऱ्या हिंदुस्थानच्या नागरिकांना सरकारकडून इतकी वाईट वागणूक का दिली जाते, असा घणाघाती सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीचा आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारचे लोकशाहीविरोधी राजवटीत रूपांतर होत असताना संपूर्ण जग पाहत असल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. केंद्र सरकार कोणाशीही संवाद साधायला इतके का घाबरते, असा सवालही त्यांनी केला आहे. लडाखमधील स्थितीवरून वांगचुक आंदोलन करीत असताना त्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही. शेतकऱ्यांचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक

आपल्या न्याय्य मागण्या आणि केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. कारण केंद्र सरकारने आश्वासन देऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. शेतकऱयांनी संयमाने दोन वर्षे वाट पाहिली. मात्र केंद्र सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड दिरंगाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱयांना सरकारकडून दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;