त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा

त्या सीनला घाबरून माधुरी रडली होती, सेटवर नेमकं काय घडलं होतं; व्हिलन रंजीत यांनी सांगितला किस्सा

बाॅलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षितची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच माधुरी दिसते. नुकताच माधुरी दीक्षित हिच्याबद्दल व्हिलन रंजीत यांनी एक अत्यंत मोठा किस्सा सांगितला. अभिनेते रंजीत यांनी 500 चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

500 पैकी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये रंजीत यांनी खलनायकाची भूमिका करताना दिसले. नुकताच रंजीत यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना रंजीत हे दिसले. रंजीत म्हणाले की, प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात मला माधुरी दीक्षितसोबत सीन शूट करायचा होता. मात्र, तो सीन शूट करण्याच्या अगोदर माधुरी रडायला लागली.

हेच नाही तर तिने माझ्यासोबत काम करण्यास नकारही दिला. मुळात म्हणजे मला काय घडत आहे हेच माहिती नव्हते. चित्रपटाच्या सेटवर माधुरी येत नव्हती. या चित्रपटात माधुरी एका गरीब व्यक्तीची मुलगी होती. या चित्रपटात मला माधुरीसोबत छेडछाड करायची होती. मी विचार करत होतो की, माधुरी अजून का नाही आली.

मला माहितीच नव्हते की, काय घडत आहे. त्यानंतर शेवटी माधुरीने ऐकले आणि ती सेटवर पोहचली. त्यावेळी मला फाइट मास्टर वीरू देवगनने सांगितले की, एकाच टेकमध्ये संपूर्ण सीन शूट करायचा आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात खराब नसतात हे देखील माधुरी दीक्षितला समजवण्यात आले. त्यावेळी तिने या सीनसाठी होकार दिला.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत मिथून चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला. आता रंजीत यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रंजीत यांची खलनायक म्हणून ओळख आहे. रंजीत यांनी खूप मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रंजीत यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;