बच्चन कुटुंबांच्या घरात घुमणार शहनाईचे सूर, नव्या नंदा करणार लग्न ?

बच्चन कुटुंबांच्या घरात घुमणार शहनाईचे सूर, नव्या नंदा करणार लग्न ?

नव्या नवेली नंदा ही प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. बिग बी यांची नात नव्या नंदा ही तिच्या ‘वॉट द हेल नव्या’ या शो मुळे बरीच ट्रेंडमध्ये असते. या शोमध्ये केवळ ती नाही तर तिची आजी आणि अभिनेत्री आजी जया बच्चन तसेच नव्याची आई श्वेता बच्चन या दोघीही सहभागी होतात. वेगवेगळ्या विषयांवर त्या तिघी गप्पा मारत माहिती शेअर करत असतात. या शोच्या लेटेस्ट भागात नव्याने तिच्या आजीला एक प्रश्न विचारला, सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अलीकडेच या शोमध्ये नव्याने तिची आजी जया यांना विचारलं, की जिवलग मित्राशी लग्न करणे हा योग्य निर्णय आहे का? यावर जया स्पष्टपणे म्हणाल्या- ‘हो’. त्यावर नव्याने पुढे विचारलं की, मैत्रीच्या नात्यात प्रेम आणणे योग्य आहे का?

मित्रासाठी फिलींग्स आल्या तर…

या लेटेस्ट एपिसोडमध्ये, नव्याने तिच्या आजीला तिच्या मागच्या सीझनमध्ये दिलेल्या विधानाची आठवण करून दिली की. ‘तुम्ही तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न केलं पाहिजेर’, असं विधान जया यांनी केलं होतं. तुझं ते मत अजूनही कायम आहे का ? असा प्रश्न नव्याने जया यांना विचारला. मैत्रीच्या नात्यात रोमान्स आणणे योग्य आहे का ? विशेषत: दोन लोकं जेव्हा फक्त मित्रच असतात, तेव्हा तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न करणे योग्य आहे, असं तुला वाटतं का, असंही नव्याने आजीला विचारल.

‘रोमॅटिकली गुंतणे ठीक आहे का ?’

त्यावर जया यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत स्पष्ट उत्तर दिलं. ‘लग्नानंतर रोमान्स हा खिडकीच्या बाहेर निघून जातो ( रोमान्स उरत नाही)’. ‘ पण दोन लोकं जर एकमेकांचे चांगले मित्र असतील, तर त्यांनी ( एकमेकांमध्ये) रोमँटिकली गुंतणं हे बरोबर आहे का ?’ असा सवाल नव्याने विचारला. त्यावर नव्याची आई, श्वेताने मध्येच उत्तर दिलं. ‘ तुमच्या मनात मित्राबद्दल ( रोमँटिक) भावना असतील तर तु्म्ही त्यादृष्टीने पुढे पाऊल टाकावं की नाही असं तू विचारत आहेस का, असं विचारत श्वेता म्हणाली की हो, तुम्ही पुढे गेलं पाहिजे. कारण आपल्याकडे एकच तर आयुष्य आहे, ते पण किती छोटसं आहे’ असंही श्वेताने नमूद केलं. ‘ मला वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता’ असंही श्वेता पुढे म्हणाली.

त्या तिघींच्या या गप्पा नव्या भागात ऐकायला मिळतील, मात्र नव्याने लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नव्याच्या लग्नाची गुड न्यूज लौकरच मिळणार का, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;