…तर मोदींचा पराभव निश्चित, पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले मतांचे गणित
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी मतांचे गणित मांडले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये 63 टक्के लोकांनी मोदींच्या विरोधामध्ये मतदान केले होते. मात्र ही मतं वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरली गेली आणि त्यामुळे मोदींचा पक्ष पुढे गेला. गेल्यावेळेप्रमाणे मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून मतांचे विभाजन झाले नाही तर मोदींचा पराभव निश्चित आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विरोधातील मतांचे जास्तीत जास्त विभाजन कसे करता येईल असा प्रयत्न मोदींचा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमम किंवा इतर पक्ष असतील… या विरोधकांच्या मतांचे विभाजन करून तुकडे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. वंचित बहुजन आघाडीच्या वेगळ्या लढण्याच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
ते पुढे म्हणाले की, आता यावर काय करावे याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या वेगळ्या उमेदवारीमुळे 9 ठिकाणी भाजपचे अतिरिक्त खासदार निवडून आले होते. त्यामुळे यंदा प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे विभाजन करू नये, असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List