अभिषेक-ऐश्वर्यालाच्या लग्नाबद्दल सवाल; काजोलने दिला खास सल्ला, म्हणाली “कधीच..”
अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काजोलच्या मनात जे असतं ते तिच्या ओठांवर येतं. विषय कोणताही असो ती त्यावर मनमोकळेपणे बोलते. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि काजोल यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. करणच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये काजोलने अनेकदा हजेरी लावली. याच शोमधील तिचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे.
या चॅट शोमध्ये काजोलने अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना लग्नाबद्दल एक सल्ला दिला होता. या एपिसोडमध्ये काजोलसोबत अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसुद्धा उपस्थित होते.
करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये काजोलला विचारलं, "अभिषेक आणि ऐश्वर्याला लग्नाबद्दल कोणता सल्ला देशील?" या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली, "कभी अलविदा ना कहना हा चित्रपट कधीच पाहू नका, असा सल्ला मी त्यांना देईन." काजोलचं हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List