तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले

तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले

मिंध्यांसोबत गेलेल्यांचे परतीसाठी अनेक फोन आले. पण आता आमच्या दृष्टीने दरवाजे बंद झाले आहेत. तिकडे लाथा बसल्या म्हणून आता तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं चालेल? असा प्रश्न विचारत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर निशाणा साधला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. मिंध्यांच्या गटातील अनेकांचे फोन आल्याचं यावेळी राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले, शिंदे गटात गेलेल्यांचे आम्हाला पुन्हा पदरात घ्या, यासाठी फोन आले आहेत. आमची चूक झाली, आम्हाला पुन्हा घ्या, आम्हाला पुन्हा मशालीच्या प्रकाशात घ्या, असं म्हणत अनेकांना गेल्या काही दिवसात फोन केले, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. पण, आता चर्चा नाही, दरवाजे बंद ही आमची भूमिका आहे. जे गेले ते गेले, ज्याला गद्दारीचा शिक्का लागलो तो कधीच मोठा नसतो. तुम्हाला तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला तुमची आई आठवली, हे कसं काय चालेल? तुमच्या गैरहजेरीत ज्यांनी हा पक्ष टिकवला, वाढवला, स्वाभिमानाने लढले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, जे तुरुंगात गेले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? असं म्हणत संजय राऊतांनी गद्दारांना पुन्हा शिवसेनेत स्थान नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिंदेच्या सोबत गेलेल्यांसाठी शिवसेना आणि मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, जे शिंदेसोबत गेले त्यांच्यासाठी आमच्या मनातील दरवाजे कधीच बंद झाले आहेत. आमच्या मनाच्या भावना मातोश्री जाणतं. गद्दारांना आता पुन्हा शिवसेनेत स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनीही सांगितलं आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

राऊत पुढे म्हणाले की, भाजपने नाकारलेल्या खासदाराला प्रवेश दिला. पण त्यांना आम्ही उमेदवारी दिली नाही. ज्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत गद्दारी केली बेईमानी केली मी त्यांच्याविषयी बोलतोय, त्यांना पुन्हा स्थान नाही. यामध्ये आता फायदा तोटा नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;