…तर राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मिंध्यांना तिकीट देण्याचाही अधिकार नाही; आदित्य ठाकरेंचा टोला

…तर राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मिंध्यांना तिकीट देण्याचाही अधिकार नाही; आदित्य ठाकरेंचा टोला

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मोठ्या बाता मारणाऱ्या मिंधे गटावर मोठी नामुष्की ओढवली आहे. हिंगोलीतील उमेदवार हेमंत पाटील यांना बदलून त्यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा लागला, तर यवतमाळ-वाशीममधील भावना गवळी यांचाही पत्ता कट होणार आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार पडला तर राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मिंध्याना तिकीट देण्याचाही अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला. बुलढाणा दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

हे वाचा – गद्दारांना माफी नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले, दगाबाजांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही!

मिंधे गटाने उमेदवार बदलल्याबद्दल आणि एकाचे तिकीट कापल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “याच लोकांना शिवसेनेने, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवले होते. एका व्यक्तील तर पाच वेळा खासदार बनवले, पण काल त्यांना 9 ते 10 तास वेटिंगवर थांबूनही तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या एका मतदारसंघातील खासदारालाही तिकीट मिळालेले नाही. अजूनही दोन-तीन जण आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. मग मिंध्यांसोबत जाऊन मिळाले तरी काय?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

“पक्षासोबत जी गद्दारी करायची होती, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसलाच, पण महाराष्ट्रासोबतही बेईमानी केली. शिवसेनेतून बाहेर पडताना एक जरी उमेदवार पडला तर राजीनामा देऊ अशा घोषणा करणारे तिकीटही देऊ शकत नाही. मिंधे गटाचे असे हाल झालेले आहेत. त्यामुळे 40 गद्दारांनी विधानसभेला काय होईल याचा विचार करावा. कारण एक-एक विकेट पडत जाणार आहे”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;