‘या’ कारणामुळे निलेश साबळे याने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोडला?
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र काही दिवसांआधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शेवटचा भाग प्रदर्शित होण्याआधीच निलेश साबळेने हा कार्यक्रम सोडला.
निलेश साबळेने हा कार्यक्रम का सोडला असावा? याचा सर्वत्र चर्चा होत होती. मात्र आता निलेशने केलेल्या एका घोषणेमुळे या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. निलेश साबळे एक नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवा कार्यक्रम 20 एप्रिलपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात निलेश साबळे दिसणार आहे. याच कार्यक्रमामुळे निलेशने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सोडल्याची चर्चा होतेय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List