Lok Sabha Election 2024 : संविधानात जर बदल करायचा असेल आपल्याला बहुमत हवे, भाजप उमेदवाराकडून पुर्नोच्चार

Lok Sabha Election 2024 : संविधानात जर बदल करायचा असेल आपल्याला बहुमत हवे, भाजप उमेदवाराकडून पुर्नोच्चार

भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी संविधान बदलायचे असेल तर दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत मिळायला हवे व आपला धर्म वाचवण्यासाठी आम्ही राज्यघटनाच बदलू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप उमेदवाराकडून भाजपचे छुपे मनसुबे उघड करण्यात आले आहेत.

भाजपच्या राजस्थान नागौरच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांनी त्यांच्या प्रचार सभेत भाजप संविधानात बदल करणार असल्याचे सांगितले आहे. ”देशाच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी आम्हाल संविधानात बदल करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सदनात आम्हाला बहुमत हवे आहे. त्यामुळे आता लोकसभेत एनडीएला बहुमत मिळवायचे आहे”, असे ज्योती मिर्धा म्हणाल्या.ॉ

ज्योती मिर्धा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्योती मिर्धा या राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीआधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनंककुमार हेगडेंनेही केले होते घटनादुरुस्तीचे वक्तव्य

खासदार हेगडे यांनी सिद्धपूर येथील एका सभेत पुन्हा घटनादुरुस्तीचा विषय उपस्थित केला. राज्य घटनेत काँग्रेसने ज्या काही चुका केल्या आहेत आणि अनावश्यक भर घातली आहे ते सुधारणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी संविधान बदलणे आवश्यक आहे आणि भाजपने लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तरच भाजप हे करू शकतो, असे हेगडे म्हणाल होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;