IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार होणार?

IPL 2024 : रोहित शर्मा पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार होणार?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर त्याच्या जागी हार्दिक पंड्याची निवड चाहत्यांना आवडली नाही. पहिल्या सामन्यापासूनच हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तसंच हार्दिकच्या नेतृत्त्वात अद्याप एकही सामना मुंबई इंडियन्स जिंकू शकलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची सुत्रे आपल्या हातात घेणार असल्याची चर्चा सध्या क्रिडाक्षेत्रात रंगली आहे. हिंदुस्थानचा माजी खेळाडू मनोज तिवारीने तसे संकेत दिले आहेत.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईची लाजिरवाणी सुरुवात झाली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई विजयाचा श्री गणेशा करेल अशी सर्व चाहत्यांना आशा होती. मात्र राजस्थानने मुंबईचा सहा विकेट राखून दारुण पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी रोष व्यक्त करत पुन्हा रोहित शर्माला मुंबईचा कर्णधार करण्याची मागणी केली. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडून मनोज तिवारीने कर्णाधार बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मनोज तिवारीने क्रिकबझशी बोलताना मोठा दावा केला,”मला असे वाटत आहे की हार्दिक पंड्या दडपणाखाली आहे. त्यामुळेच त्याने राजस्थाविरुद्धच्या सामन्यात गोलंदजी केली नाही. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये सुरुवातीला चेंडू स्विंग होत असताना त्याने गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याने काल गोलंदाजी केली पाहिजे होती” असे मत यावेळी मनोजने व्यक्त केले.

“रविवारपर्यंत मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी मोठा निर्णय जाहीर करेल असे मला वाटत आहे. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवले जाईल. फ्रँचायझी क्रिकेट किंवा त्यांच्या मालकांना जेवढ मी समजतो, त्यानुसार ते निर्णय घेताना कोणताही मागचापुढचा विचार करत नाहीत. हार्दिकचे नेतृत्व साधारण दिसले असून मुंबईला अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही. गोलंदाजांचा त्याला योग्य वापर करता आलेला नाही. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जसप्रित बुमराहला 13व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली. त्यामुळे फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण सध्याचे वातावरण मुंबई इंडियन्ससाठी योग्य नाही,” असा दावा यावेळी मनोज तिवारीने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;