अभिनेत्रीचा सहा महिन्यात घटस्फोट, पतीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं, ‘तिला एकही रुपया देऊ नका..’

अभिनेत्रीचा सहा महिन्यात घटस्फोट, पतीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं, ‘तिला एकही रुपया देऊ नका..’

बॉलिवूड विश्वात अफेअर, ब्रेकअप, लग्न आणि मग घटस्फोट या गोष्टी फार सर्वसामान्य झाल्या आहेत. लव्ह मॅरेज करूनही बी-टाऊनमधल्या अनेक जोडप्यांचं लग्न यशस्वी होऊ शकलं नाही. म्हणूनच लग्नाच्या काही वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला आणि नंतर दुसरा जोडीदार शोधला. याच इंडस्ट्रीत एक अभिनेत्री अशीही आहे, ज्यांनी मोठ्या बिझनेसमनशी लग्न केलं आणि काही महिन्यांतच हे दोघं विभक्त झाले. 70 च्या दशकात या अभिनेत्रीची गणना बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जायची. एका विवाहित अभिनेत्यासोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा आजही चवीने चघळल्या जातात. या अभिनेत्रीने एकेकाळी मोठ्या व्यावसायिकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर तिला पतीविषयी अशी गोष्ट समजली, ज्यामुळे सहा महिन्यांतच तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूडच्या एव्हरग्रीन रेखा आहेत. त्यांनी 1979 मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केलं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वांनाच माहित आहेत. मात्र रेखा यांनी दिल्लीचे बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. 4 मार्च 1990 रोजी जुहूमधल्या मुक्तेश्वर देवालय मंदिरात रेखा आणि मुकेश यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर रेखा यांच्यासमोर मुकेश यांच्याविषयी अनेक खुलासे झाले आणि दोघांमध्ये खूप भांडणं होऊ लागली होती. जेव्हा रेखा त्यांची सेक्रेटरी फरजाना यांना सोडायला तयार नव्हत्या, तेव्हा मुकेश यांना ही गोष्ट सहन झाली नाही.

सतत होत असलेल्या भांडणांमुळे रेखा यांनी मुकेश यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा मुकेश यांना समजली तेव्हा त्यांच्यासाठी हा धक्का पचवणं कठीण होतं. लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी रेखा यांच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. आयुष्य संपवण्याआधी त्यांनी एक सुसाइड नोटसुद्धा लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांच्या संपत्तीमधून रेखा यांनी एकही रुपया मिळू नये. “मी तिच्यासाठी काहीच सोडून जात नाहीये. कारण ती स्वत: कमावण्यालायक आहे,” असं त्यांनी लिहिलं होतं.

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार हे मुकेश अग्रवाल यांचे खूप जवळचे मित्र होते. मुकेश यांच्या आत्महत्येनंतर त्यांनी खुलासा केला होता की रेखा यांनी दिवंगत पतीच्या संपत्तीमधून एकही रुपया मागितला नव्हता. मुकेश यांच्या भावानेही स्पष्ट केलं होतं की जे लोक असं म्हणतात की रेखा यांनी मुकेशशी पैशांसाठी लग्न केलं होतं. त्यांना मी हे सांगू इच्छितो की रेखा यांनी मुकेश किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून काहीच पैसे मागितले नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;