IND Vs SA 2nd Test – दक्षिण आफ्रिकेला नमवण्यासाठी रवी शास्त्रींचा टीम इंडियाला अनोखा सल्ला, आता सामना जिंकणार?

IND Vs SA 2nd Test – दक्षिण आफ्रिकेला नमवण्यासाठी रवी शास्त्रींचा टीम इंडियाला अनोखा सल्ला, आता सामना जिंकणार?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 489 धावांची भक्कम धावसंख्या उभी केली आहे. मुथुसामीने केलेल्या 109 धावांच्या शतकीये खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 400 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात 36 षटकांचा खेळ संपला तेव्हा 4 गड्यांच्या मोबदल्यात 102 धावा केल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला अनोखा सल्ला दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागेल. अन्यथा दक्षिण आफ्रिका सामन्यासह मालिका सुद्धा जिंकेल. रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्शी बोलताना म्हणाले की, “हिंदुस्थानी फलंदाजांनी पहिल्या डावात जास्त वेळ न घालवता वेगाने धावसंख्या उभी केली पाहिजे. तसेच गरज पडल्यास दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी धावांमध्ये टीम इंडियाने आपला डाव घोषित केला पाहिजे. यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात कमी धावसंख्येवर सर्वबाद करून लक्ष्य निश्चित करू शकेल.” असा सल्ला रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला दिला आहे.

रवी शास्त्रींनी टीम इंडियाला दिलेल्या सल्ल्याचा विचार करता अशा प्रकारचा प्रयोग टीम इंडियाने आतापर्यंत 4 वेळा केला. जेव्हा टीम इंडियाने विरुद्ध संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी धावांमध्ये आपला पहिला डाव घोषित केला. परंतु हा प्रयोग टीम इंडियाच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. कारण संघाला चारपैकी एकाही सामन्यात जिंकता आले नाही. चारपैकी तीन सामने अनिर्णीत सुटले तर एका सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र...
तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
व्हिटॅमिन सीचे भांडार आहे हे फळ, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक, जाणून घ्या
IND Vs SA 2nd Test Match – यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी; WTC मध्ये असं करणारा हिंदुस्थानचा पहिलाच फलंदाज
दिल्लीत इंडिया गेटसमोर नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला, 23 जणांना अटक
काबूलहून येणारे विमान चुकून टेक-ऑफ रनवेवर उतरले, दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
तीस देशांच्या दुतावासांतील शिष्टमंडळाला अजिंठा लेणीची भुरळ!