वन्यजीव व्यवस्थापनासाठी सह्याद्री, रेस्क्यू यांच्यात करार

वन्यजीव व्यवस्थापनासाठी सह्याद्री, रेस्क्यू यांच्यात करार

सह्याद्री परिसरातील वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, तातडीची पशुवैद्यकीय मदत, प्राणीसंख्या व्यवस्थापन आणि मानव–वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारांतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू एकत्रितपणे वन्यजीव आरोग्य व पशुवैद्यकीय सेवा, वैज्ञानिक पद्धतीने वन्यजीव पकड व स्थलांतर तसेच आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली बळकटीकरण यावर कार्य करतील. प्रशिक्षित पशुवैद्यकीय आणि तांत्रिक पथकांची नेमणूक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित कार्यपद्धती, मुक्ततानंतर निरीक्षण प्रणाली आणि आघाडीच्या कर्मचाऱयांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम हे या सहयोगाचे प्रमुख घटक असतील. दोन्ही संस्था सह्याद्री परिसरातील वन्यजीव संख्यावाढ उपक्रम आणि दीर्घकालीन संवर्धन नियोजनालाही सक्रिय पाठबळ देतील.

सह्याद्री परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाधारित नियोजन, कुशल तांत्रिक पथके आणि व्यावसायिक पशुवैद्यकीय साहाय्य अनिवार्य आहे. या भागीदारीमुळे आमची क्षेत्रीय क्षमता वाढेल, हस्तक्षेपांची गुणवत्ता अधिक सक्षम होईल आणि प्रत्येक कार्य सर्वोच्च संवर्धन मानकांनुसार पार पाडता येईल, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक तुषार चव्हाण यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले.

संवर्धनाचे काम होईल परिणामकारक!

सह्याद्री हा महाराष्ट्रातील जैववैविध्य वारसा लाभलेला परिसर असून, त्याच्या संवर्धनासाठी साहाय्य करणे हे आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. सुरक्षित, वैज्ञानिक व प्राणीकल्याणाधिष्ठत पद्धतींनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे क्षेत्रातील कारवाई अधिक सुरक्षित, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि संवर्धनाचे परिणाम अधिक दृढ होतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्षा नेहा पंचमिया यांनी या संदर्भात बोलताना दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ‘वीरूची एक्झिट’.. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. बाॅलीवूडमध्ये त्यांना हिमॅन या नावाने ओळखले जात असे. धर्मेंद्र...
तमिळनाडूमध्ये दोन बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
व्हिटॅमिन सीचे भांडार आहे हे फळ, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक, जाणून घ्या
IND Vs SA 2nd Test Match – यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक कामगिरी; WTC मध्ये असं करणारा हिंदुस्थानचा पहिलाच फलंदाज
दिल्लीत इंडिया गेटसमोर नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला, 23 जणांना अटक
काबूलहून येणारे विमान चुकून टेक-ऑफ रनवेवर उतरले, दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
तीस देशांच्या दुतावासांतील शिष्टमंडळाला अजिंठा लेणीची भुरळ!