मुंबईच्या सुशोभीकरणाचा बोजवारा
मुंबई महानगरपालिकेने मिंधे सरकारच्या आदेशानंतर मोठा गाजावाजा करत मुंबईत सुशोभीकरणाची मोहीम राबवली. या प्रकल्पाअंतर्गत मोकळय़ा जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले. त्याचबरोबर त्यासाठी केलेल्या जाहिरातींवरही 118 कोटी रुपये खर्च केले. मात्र मुंबईतील विविध भागांत मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱया आणि त्यातून विविध समाजोपयोगी संदेश देणाऱया प्रतिकृतींची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नाना चौक येथे कारंजा बंद पडला आहे. तर ‘डी’ विभागाच्या प्रवेशद्वारासमोरील शांततेचे प्रतीक असलेल्या कबुतरांच्या शिल्पाचीही वाताहत झाली आहे. वरळीच्या काही चौकांतही अशीच स्थिती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List