राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते असे वादग्रस्त विधान भाजप नेते इंदर सिंह परमार यांनी केले आहे. तसेच ते शिक्षणाच्या नावाखाली ते धर्मांतराचा अजेंडा राबवत होते असेही परमारम म्हणाले.

इंदर सिंह परमार म्हणाले की, राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांचे एजंट होते. देशभरात मिशनरी शाळा उपलब्ध होत्या, जिथे शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा राबवला जात होता. त्या काळात संथाल परगणा पर्यंत इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली या देशातील लोकांची आस्था बदलण्याचे दुष्चक्र चालू होते. यासाठी इंग्रजांनी अनेकांना भारतीय समाजसुधारक बनवले होते, ज्यात राजा राममोहन रॉय यांचाही समावेश होता. परमार यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदर सिंह परमार पुढे म्हणाले की डॉ. भीमराव आंबेडकर अनुसूचित जाती वर्गाप्रमाणेच अनुसूचित जमाती वर्गासाठीही विशेष तरतुदी करू इच्छित होते, परंतु पंडित नेहरू यांनी ते मान्य केले नाही. यामुळे धार-झाबुआसह सर्व आदिवासी भागांमध्ये धर्मांतराची स्थिती निर्माण झाली. आता आम्ही प्रयत्न करू की अशा प्रकारची धर्मांतराची परिस्थिती निर्माण होऊ नये. मंत्री परमार यांनी माजी सरकारांवर आदिवासी नेते, खरे स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक यांचा इतिहास दाबून ठेवण्याचा आरोपही केला.

देशात काही लोकांना महान ठरवून खऱ्या वीरांना विसरण्याचा प्रयत्न झाला. परंतु बिरसा मुंडा यांसारख्या क्रांतिसूर्याने मातृभूमीच्या सन्मानासाठी सर्वस्व अर्पण केले. मंत्री म्हणाले की आता दडपलेल्या खऱ्या इतिहासाशी लोकांना परिचित केले जाईल. लोकांना सत्य सांगितले जाईल. एमपीचे शिक्षण मंत्री परमार यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा इतिहासावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांच्या शिक्षणावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमधल्या त्रंब्यकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळा ही...
वडिलांनी एक इशारा दिल्यास बिहारची जनता जयचंदांना गाडेल; तेजप्रताप बहिण रोहिणीच्या अपमानावर संतापले
भयंकर ! संपत्तीसाठी चार मावश्यांनी मिळून 22 दिवसांच्या भाचाची केली हत्या
रत्नागिरीत भाजपला धक्का, ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी दिडशे समर्थकांसह बांधले शिवबंधन
राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
नांदेडमध्ये कुख्यात गुंड रबज्योत सिंग याला अटक
लग्नाच्या तासाभराआधी नवऱ्याची सटकली, साडीवरून झालेल्या भांडणातून होणाऱ्या पत्नीची केली हत्या