बिहार निवडणुकीत पैशांचा महापूर; जागतिक बँकेचा 14 हजार कोटींचा निधीही वळवला, कुणी केला हा गंभीर आरोप?

बिहार निवडणुकीत पैशांचा महापूर; जागतिक बँकेचा 14 हजार कोटींचा निधीही वळवला, कुणी केला हा गंभीर आरोप?

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी झाली आणि एनडीएने पाशवी बहुमत मिळवली. या एकतर्फी आणि अनपेक्षित निकालानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकून अधिकृतपणे मते खरेदी केली गेली असा आरोप आता होत असून यासाठी थेट जागतिक बँकेचा निधीही वळवण्यात आल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने केला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 10 हजार रुपये देण्यासाठी जागतिक बँकेचा 14 हजार कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला. हा निधी विकास प्रकल्पांसाठी राखीव होता, मात्र त्याचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आला, असा आरोप जनसुराज पक्षाचे उदय सिंह यांनी केला असून याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

उदय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला. बिहार निवडणुकीचा निकाल विकत घेतला गेला असून हा जनादेश मिळवण्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करणअयात आले. जनतेच्या पैशाचा वापर करून एनडीएने लोकांचे मते विकत घेतली. यासाठी जागतिक बँकेकडून मिळालेला निधीही वापरण्यात आला, असा दावा उदय सिंह यांनी केला.

आचारसंहिता लागू होण्याच्या एक तास आधी जागतिक बँकेचे 14 हजार कोटी काढून राज्यातील 1.25 कोटी महिलांना वाटण्यात आले. बिहारवर सध्या 4.06 लाख कोटींचे कर्ज असून त्यावर दररोज 63 कोटी रुपयांच्या व्याजाचा भार पडत आहे, असे म्हणत बिहारची तिजोरी रिकामी असल्याचा आरोपही सिंह यांनी केला.

कुछ गड़बड़ बा… बिहारच्या निकालावर काँग्रेस आक्रमक… निवडणुकीतील घोटाळ्याचा पर्दाफाश दोन आठवड्यांत करणार

दरम्यान, निवडणूक रणनीतीकार म्हणून उदयाला आलेले आणि नंतर राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जनसुराज पक्षाला बिहार निवडणुकीमध्ये नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. 238 मतदारसंघात निवडणूक लढवून त्यांना एकही जागा जिंकला आली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांच्या शिक्षणावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमधल्या त्रंब्यकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळा ही...
वडिलांनी एक इशारा दिल्यास बिहारची जनता जयचंदांना गाडेल; तेजप्रताप बहिण रोहिणीच्या अपमानावर संतापले
भयंकर ! संपत्तीसाठी चार मावश्यांनी मिळून 22 दिवसांच्या भाचाची केली हत्या
रत्नागिरीत भाजपला धक्का, ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी दिडशे समर्थकांसह बांधले शिवबंधन
राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
नांदेडमध्ये कुख्यात गुंड रबज्योत सिंग याला अटक
लग्नाच्या तासाभराआधी नवऱ्याची सटकली, साडीवरून झालेल्या भांडणातून होणाऱ्या पत्नीची केली हत्या