ऑपरेशन सिंदूरचा काहीही सकारात्मक फायदा झाला नाही, फारुक अब्दुल्ला यांचे मत

ऑपरेशन सिंदूरचा काहीही सकारात्मक फायदा झाला नाही, फारुक अब्दुल्ला यांचे मत

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान -पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना सुधारण्याच्या दिशेने काम करायला हवे. यासोबतच त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना सांगितले की या ऑपरेशनमुळे काहीही साध्य झाले नाही असेही अब्दुल्ला म्हणाले.

फारूक अब्दुल्ला म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हिंदुस्थानने केलेल्या अचूक हल्ल्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ असे म्हटले जाते, परंतु या ऑपरेशनचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही आणि यात फक्त अनेकांचा मृत्यू झाला. त्यांनी म्हटले, “मला आशा आहे की ऑपरेशन सिंदूरसारखी गोष्ट पुन्हा होणार नाही. या ऑपरेशनमधून काहीही निष्पन्न झाले नाही. आपल्या लोकांचा जीव गेला. आपल्या सीमांवर तडजोड झाली. मला आशा आहे की दोन्ही देश आपले संबंध सुधारतील. हेच एकमेव मार्ग आहे.”

तसेच अशा प्रकारच्या ऑपरेशनची पुनरावृत्ती केल्याने दोन्ही देशांतील आणि नियंत्रण रेषेजवळील शांततेलाच धक्का बसेल. हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधांवर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रसिद्ध ओळीचा उल्लेख करत अब्दुल्ला म्हणाले, “मी तेच पुन्हा सांगू इच्छितो जे वाजपेयीजी म्हणाले होते. मित्र बदलता येतात, पण शेजारी नाही.” त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांनी पुन्हा संवाद सुरू करावा आणि कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने काम करावे, असे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा Video बालवाडीतील मुलांना येतात हजार पर्यंतचे पाढे, सर्व विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहतात; अशी आहे नाशिकमधली ही जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषद शाळांमधल्या मुलांच्या शिक्षणावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र नाशिकमधल्या त्रंब्यकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळा ही...
वडिलांनी एक इशारा दिल्यास बिहारची जनता जयचंदांना गाडेल; तेजप्रताप बहिण रोहिणीच्या अपमानावर संतापले
भयंकर ! संपत्तीसाठी चार मावश्यांनी मिळून 22 दिवसांच्या भाचाची केली हत्या
रत्नागिरीत भाजपला धक्का, ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी दिडशे समर्थकांसह बांधले शिवबंधन
राजा राममोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
नांदेडमध्ये कुख्यात गुंड रबज्योत सिंग याला अटक
लग्नाच्या तासाभराआधी नवऱ्याची सटकली, साडीवरून झालेल्या भांडणातून होणाऱ्या पत्नीची केली हत्या