वडीगोद्री हायवेवर भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील जालना -वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावरअपघातांची मालिका सुरूच आहे. येथे आज दुपारी ३ वाजता जालन्यातील धाकलगाव येथे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण
गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली दुचाकी आल्याने दुचाकीचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याखाली येवून कोसळला.
युरियाने लोड असलेला ट्रक क्र.(एम.एच. 26 बी. ई. 2928) हा जालन्याकडुन शहागडकडे जात होता. यावळी धांकलगाव येथे अचानक टायर फुटल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व समोरुन वडीगोद्रीकडून शहापूरकडे येणारी दुचाकी ट्रकच्या टायर खाली आली. त्यामुळे दुचाकीचा अक्षरशा चुराडा झाला आहे. यात दुचाकी स्वार दत्ता
बर्डे (२७) रा.शहापुर ता.अंबड व गणेश गव्हाणे (२८) रा.बनटाकळी ता.अंबड जि. जालना हे दोन जन गंभीर जख्मी झाले. जखमींना उपचारासाठी जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ट्रक चालक हा स्टेरिंगच्या खाली दबल्याने त्याला जेसीपीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.तसेच उपचारासाठी या तिघांनाही जालना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List