17 वर्षांनंतर टोलचे नियम बदलणार; नीती आयोग आणि आयआयटी दिल्ली ठरवणार नवीन दर

17 वर्षांनंतर टोलचे नियम बदलणार; नीती आयोग आणि आयआयटी दिल्ली ठरवणार नवीन दर

केंद्र सरकार टोल करवसुलीच्या नियमांत बदल करण्याची तयारी करत आहे. टोलचे दर निर्धारित करण्यासाठी नव्या पद्धतीने अभ्यास करण्यास केंद्राने नीती आयोगाला सांगितले आहे. 17 वर्षांनंतर राष्ट्रीय महामार्गाच्या टोल मसुद्यावर संशोधन केले जाणार आहे. हे काम नीती आयोगाने आयआयटी दिल्लीला दिलेले आहे. आयआयटी दिल्लीने हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

देशात टोल कराची सुरुवात 1997 सालापासून झाली. त्याकाळी  वाहन चालवण्यासाठी लागणारा खर्च, रस्त्यांचा वापर केल्याने वाहनांचे होणारे नुकसान आणि लोकांची टोल देण्याची  इच्छा या बाबींवर टोल कर ठरवण्यात यायचा. 2008 पासून  इंडेक्स सिस्टीम लागू करण्यात आली. याअंतर्गत दरवर्षीच्या वाढत्या महागाईच्या हिशेबाने टोल आकारणी करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी कोणताही विशेष अभ्यास करण्यात आला नव्हता. टोल कराचे नवीन नियम  न्याय्य आणि व्यावहारिक करण्याचा सरकारचा विचार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या स्फोटामागे मोठा कट तर नाही ना? दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला संशय या स्फोटामागे मोठा कट तर नाही ना? दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला संशय
    लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबाबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Video -ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा अनावधानाने गेला तोल
Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटातील कार आमची नाही, आमची मुलं दिल्लीला गेलीच नाहीत; कुटुंबीयांचा दावा
डेव्हिड स्झालाय यांच्या फ्लेश कांदबरीला यंदाचा बुकर पुरस्कार
धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, ईशा देओलने दिली मोठी अपडेट
कल्याण, टिटवाळ्यात रहिवाशांचा आज ड्राय डे; 12 तास पाणीपुरवठा बंद
नवे ठाणे, कोपरी सॅटिस आणि पाण्याच्या टाक्यांचा कासव झाला, अडीच वर्षे उलटली तरी स्मार्ट सिटी नाही; तीन प्रकल्प रखडले