अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख

अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिह्यातील  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शशिकांत गाडे यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी राजेंद्र दळवी (पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, कर्जत-जामखेड, राहुरी) आणि किरण काळे यांच्याकडे (अहिल्यानगर मनपा, अहिल्यानगर विधानसभा) महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रावजी नांगरे उपजिल्हाप्रमुख (कर्जत-जामखेड-शेवगाव), गिरीश जाधव उपजिल्हाप्रमुख (नगर शहर), दीपक भोसले उपजिल्हाप्रमुख (राहुरी, श्रीगोंदा), तर मनोज गुंदेचा (पारनेर शहर) यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप, वसईच्या कोर्टातून पळाला… वाडीत सापडला ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप, वसईच्या कोर्टातून पळाला… वाडीत सापडला
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी दानिश खान उर्फ जमीर (23) याला अटक करून पोलिसांनी त्याला आज वसई न्यायालयात हजर केले....
वाड्यातील क्रीडा संकुलाची दहा वर्षापासून रखडपट्टी, अतिक्रमणाचा विळखा; क्रीडा विभागाची उदासीनता
शहापूरमधील 20 हजार शेतकऱ्यांचा भात जाणार व्यापाऱ्यांच्या घशात, 2 हजार 389 ऐवजी क्विंटलला मिळणार 1 हजार 300 रुपयांचा कवडीमोल दर
धर्मेंद्र यांचे निधन झाले नाही, मुलगी ईशा देओलने केली पोस्ट
पहिल्या दिवशी शून्य अर्ज, नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक; ठाणे, पालघर, रायगडात निरंक
घारापुरी बेटावर सापडल्या पुरातन वस्तू, पुरातत्व विभागाने सुरू केले उत्खनन इतिहासावर पडणार आणखी प्रकाश
17 वर्षांनंतर टोलचे नियम बदलणार; नीती आयोग आणि आयआयटी दिल्ली ठरवणार नवीन दर