बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल

बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या एक आठवडा आधी महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. २० वर्षांपासून हे १० हजार रुपये कुठे होते? असा सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमधील एनडीए सरकारला विचारला आहे. बिहारमधील सोनबरसा येथे निवडणूक सभेत संबोधित करताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणल्या की, “याआधी महिला संघर्ष करत नव्हत्या का? महिलांना २० वर्षे का वाट पहावी लागली? भाजप-जेडीयूचे हेतू स्पष्ट नाहीत. त्यांचा हेतू ओळखा. त्यांच्याकडून १०,००० रुपये घ्या, पण त्यांना मतदान करू नका.”

प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, “भाजप-जेडीयू सरकारने फक्त महिलांची फसवणूक केली आहे. त्यांना त्यांचे संघर्ष कधीच समजले नाहीत आणि आता ते निवडणुकीच्या वेळी पैशाने मते खरेदी करू इच्छितात. पण बिहारने त्यांचे हेतू ओळखले आहेत, ते त्यांच्या मतांनी योग्य उत्तर देईल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की, “नरेंद्र मोदींनी सर्व मोठे उद्योग त्यांच्या मित्रांना दिले आहेत. गौतम अदानींना बिहारमध्ये एक रुपया प्रति एकर दराने जमीन देण्यात आली होती, पण जर तुम्ही ती जमीन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. तसेच तुमचे कर्ज कधीही माफ होणार नाही, परंतु मोदीजींच्या मित्रांचे हजारो कोटी रुपये माफ झाले आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही...
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती