राज्यात हिवाळ्याचे आगमन लांबणार; पावसाचा नोव्हेंबरमध्येही मुक्काम, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात हिवाळ्याचे आगमन लांबणार; पावसाचा नोव्हेंबरमध्येही मुक्काम, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात साधारणपणे दिवाशी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते. मात्र, यंदा सलकर आलेला मॉन्सून अद्याप परतण्याचे नाव घेत नाही. परतीचा मॉन्सून राज्याच्या सीमेवरच रखडला आहे. तसेच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता नोव्हेंबरमध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपत आहे. बदल्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

आता नोव्हेंबर महिना उजाडला, थंडीची चाहूल तर दूरच पण जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले असून सोमवारीही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर राज्यातील इतर भागांतही वेगाने वारे वाहतील, जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीची अद्याप चाहूल लागलेली नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे. यंदा लवकर आलेल्या पावसाचा मुक्काम नोव्हेंबरपर्यंत लांबला आहे. त्यामुळे थंडीचे आगमनही उशीरा होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या एक आठवडा आधी महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. २० वर्षांपासून...
हिंदी माझी मावशी, माय मरो मावशी जगो! प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
Mumbai News – वारंवार परदेश दौरै करणाऱ्या महिलेला वाढीव पोटगी देण्यास नकार, सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
ॲमेझॉनने पहाटे दोन मेसेज केले, 14 हजार कर्मचाऱ्यांना घरचा आहेर दिला
‘समीक्षा’ प्राचीन हिंदुस्थानी शास्त्रार्थांचा अनुभव देणारी स्पर्धा, वैदिक परंपरांविषयी जागृतीचा अनोखा प्रयत्न
रत्नागिरी शहरातील समस्यांना वाचा फोडणारी पदयात्रा, शिवसेनेच्या पदयात्रेने शहर ढवळून निघाले
Photo – शिवसेनेत इनकमिंगचा धडाका, उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत