भीषण अपघात! जयपूरमध्ये मद्यधुंद डंपर चालकाने 50 लोकांना चिरडले, 10 जणांचा मृत्यू

भीषण अपघात! जयपूरमध्ये मद्यधुंद डंपर चालकाने 50 लोकांना चिरडले, 10 जणांचा मृत्यू

राजस्थानातील जयपूर येथे एक भीषण अपघात घडला आहे. मद्यधुंद डंपर चालकाने एका पाठोपाठ 5 गाड्यांना जबरदस्त  धडक दिली, ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनेकजण गाड्यांच्या खाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हा अपघाच लोहामंडी परिसरात घडला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डंपरच्या समोर जो कोणी येत होतं त्यांना चिरडत गेला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पहिल्या कारला टक्कर मारल्यानंतर तो न थांबता पुढच्या चार गाड्यांना धडक देत गेला. तर अन्य एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की. डंपर चालक 5 किमीपर्यंत जे दिसेल त्याच्यावर आदळत जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक 5 गाड्यांना टक्कर मारत 50 लोकांना चिरडले. ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अजूनही काही लोकं गाड्यांच्या खाली दबली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून डंपर चालक आणि मालक दोघांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही...
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती