नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे – मल्लिकार्जुन खरगे

नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे – मल्लिकार्जुन खरगे

नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. बिहारमधील राजा पाकर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, “पंचायत निवडणुकीपासून ते संसदीय निवडणुकांपर्यंत मोदीच सगळीकडे फिरत आहेत. त्यांचा चेहरा प्रत्येक वेळी दिसतो. मोदींचा चेहरा पाहून लोक किती वेळा मतदान करतील?”

यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “आज देशभरात दलितांना धमकावले जात आहे. मोदी आणि नितीश कुमार यांना दलितांची काहीच पर्वा नाही. त्यांना फक्त त्यांच्या पदांची काळजी आहे. समाजवादी विचारसरणीबद्दल बोलणारे नितीश कुमार दलित, मागासवर्गीय आणि अति मागासवर्गीयांना विसरून भाजपशी हातमिळवणी केली.”

ते म्हणाले, “आज नितीश कुमार मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्या, महिलांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि दुर्बल घटकांना दडपणाऱ्या भाजपसोबत उभं आहे. म्हणूनच आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रेंड – ऊन-पाऊस एकाच फ्रेममध्ये ट्रेंड – ऊन-पाऊस एकाच फ्रेममध्ये
निसर्गाचा अद्भुत चमत्कार दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाऊस पडतो जेव्हा संपूर्ण वातावरण ढगाळ बनते. वेगवेगळ्या भागात पडणाऱ्या...
नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी