भारतीय टी-20 संघाची घोषणा एप्रिल अखेरीस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने जून महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड एप्रिल महिन्याच्या अखेरीस केली जाईल, असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या संघांना आपल्या खेळाडूंची यादी 1 मेपर्यंत सादर करण्याची अट आयसीसीने घातली आहे. दरम्यान 25 मेपर्यंत संघाला आपल्या संभाव्य खेळाडूंमध्ये फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ जाहीर होईल. एप्रिलच्या अखेरीपर्यंत आयपीएलाचा निम्मा टप्पा संपतो. दरम्यान या स्पर्धेसाठी इच्छुक क्रिकेटपटूंच्या फॉर्म तसेच तंदुरूस्तीबाबत राष्ट्रीय निवड समिती सदस्यांना विचार करावा लागेल. 19 मे रोजी आयपीएल स्पर्धेचा लीग टप्पा संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कला रवाना होईल.

दरम्यान टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्याकरीता सध्या निवड समितीमधील चार सदस्य आयपीएलच्या विविध सामन्यावेळी हजर राहून नवोदित क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;