पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप

पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पंढरपूर शहरातील रस्त्यांना फटका बसला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत. तसेच कार्तिकी यात्रेत येणाऱया वारकऱयांना प्रशासनाकडून 6 लाख पाणी बाटल्या, तर 6 लाख ज्यूसच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना पुरवण्यात येणाऱया सेवा सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांत सचिन इथापे, डीवायएसपी प्रशांत डगळे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, कार्तिकी यात्रेला किमान 10 ते 12 लाख भाविक येतील, असा अंदाज धरून सेवासुविधा पुरवण्यात येत आहेत. पंढरपूर शहर तसेच चंद्रभागा वाळवंट, भक्तिसागर येथे स्वच्छतेचे काम पूर्ण झालेले आहे. तर, यात्राकाळातही स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे भाविक, वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अडीच कोटी रुपये खर्चून दोन दिवसांत शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर, यात्रा काळात मोकाट जनावरे रस्त्यांवर दिसणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार आहे. पावसाचे दिवस लक्षात घेता, दर्शन रांगेत बारा ठिकाणी दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेत भाविकांना सुरक्षारक्षकांकडून कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे म्हणून व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येत आहे. तर, भाविकांना 6 लाख पाणी बाटली व 6 लाख ज्यूस बॉटल्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

कॉरिडॉर रद्दसाठी नव्हे; तर जादा मोबदल्यासाठी विरोध करू शकता

पंढरपूर कॉरिडॉर रद्द होण्यासाठी विरोध करणारे कमी आहेत.जे विरोध करत आहेत, त्यांना सांगणे आहे की, तुम्ही योग्य मोबदला मिळण्यासाठी, भूसंपादन व्यवस्थित झाले नसल्याबाबत विरोध करा, प्रसंगी कोर्टात जावा; मात्र केवळ शासनानाचा प्रकल्प असलेला कॉरिडॉर रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊन वेळ घालवू नका. कारण आजपर्यंत शासनाचा प्रकल्प रद्द झालेल्या घटना निदर्शनास आलेल्या नाहीत, त्यामुळे कॉरिडॉर होणार आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक