नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या होती, बिहारच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या होती, बिहारच्या सभेत राहुल गांधी यांचा घणाघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या मुजफ्फरपूर येथे तेजस्वी यादव यांच्यासह निवडणूक सभेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील युवक निराश आहेत. मी जिथेही जातो तिथे बिहारचे युवक भेटतात. नितीश कुमार गेली 20 वर्षे सत्तेत आहेत, पण त्यांनी काहीच केले नाही. बिहारच्या युवकांना त्यांच्या राज्यात संधी मिळत नाही. बिहारमध्ये बिहारच्या लोकांचे भविष्य नाही. तेजस्वी यादव बिहारला पुढे नेऊ इच्छितात, पण नितीश कुमार यांचे रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. पंतप्रधान मोदी जातनिहाय जनगणनेवर काही बोललेच नाहीत, ते फक्त मतांसाठी काहीही करतील.

राहुल गांधी म्हणाले की नितीश कुमार स्वतःला अती मागास म्हणवतात. पण गेल्या 20 वर्षांत त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी काय केले आहे? तुम्हाला असे राज्य हवे का जिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही? आम्हाला असा बिहार नको आहे. आम्हाला असा बिहार हवा आहे जिथे चांगले आरोग्य, शिक्षण आणि रोजगार उपलब्ध असेल.

राहुल गांधी म्हणाले की नितीशजींच्या चेहऱ्याचा वापर केला जात आहे. रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. अती मागास जनतेचा आवाज तिथे ऐकला जात नाही. तीन-चार लोक सगळे काही नियंत्रित करतात आणि भाजप त्याचे नियंत्रण करते. त्यांना सामाजिक न्यायाशी काही देणेघेणे नाही. मी लोकसभेत पंतप्रधानांसमोर स्पष्ट सांगितले की जातनिहाय जनगणना करा, पण त्यांनी एक शब्दही बोलले नाही. भाजप सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि ते ते होऊ देणार नाहीत.

पंतप्रधान मोदी छठ पूजा करू शकतील म्हणून दिल्लीतील यमुना नदीच्या काठी स्वच्छ पाण्याचा तलाव तयार करण्यात आला. यमुनेतील पाणी इतके घाण होते की कोणी प्यायले किंवा त्यात अंघोळ केली तर आजारी पडेल. पण मोदीजींना फक्त नाटक करायचे होते. म्हणून पाइपमधून स्वच्छ पाणी आणले गेले. टीव्हीवर तो पाइप दिसला आणि मोदीजींना आपला कार्यक्रमच रद्द केला. त्यांना यमुना किंवा छठ पूजेशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त तुमचे मत हवे आहे. तुम्ही सांगाल की मतांसाठी स्टेजवर नाचा, तर ते नाचतील. मतांसाठी ते काहीही करतील.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की भाजपने महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये निवडणुका चोरी केल्या आहेत. ते बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक SIR च्या नावाखाली तेच करत आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे. महागठबंधनच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडले पाहिजे. आम्ही असे सरकार बनवू ज्यात सगळे असतील, कुणाशीही भेदभाव होणार नाही.

राहुल गांधी म्हणाले, तुमच्या फोनच्या मागे काय लिहिले आहे? ‘मेड इन चायना’. मोदीजींनी नोटबंदी आणि जीएसटी लागू करून लहान-मोठे सगळे व्यवसाय बरबाद केले. आता सर्वत्र ‘मेड इन चायना’ दिसते. पण आम्ही म्हणतो ‘मेड इन बिहार’ असावे. मोबाईल, शर्ट, पॅन्ट हे सर्व बिहारमध्ये तयार व्हावेत आणि बिहारच्या युवकांना त्या कारखान्यांमध्ये रोजगार मिळावा. आम्हाला असाच बिहार हवा आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;