निधीचे असमान वाटप हे लोकशाहीविरोधी कारस्थान; संजय राऊत यांचा घणाघात

निधीचे असमान वाटप हे लोकशाहीविरोधी कारस्थान; संजय राऊत यांचा घणाघात

आमदार विकासनिधीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या काळात विकसकामांच्या असमान निधीचा पायंडी पडला आहे. हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असून हो लोकशाहीविरोधी कारस्थान आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मिंध्यावर हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री आणि सरकार कोणत्याही पक्षाचे नसते, ते राज्याचे असेत. मात्र, फडणवीस आणि मिंधे यांच्या काळात चुकीचा पायंडा पडला आहे. जे त्यांच्या जवळचे आमदार आहे, त्यांच्या मतदारसंघाला भरभरून निधी मिळतो. विरोधी पक्षांचे मतदारसंघ कोरडेच राहतात. हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर कृत्य आहे. हे लाकशाहीविरोधी कारस्थान आहे. तुम्हाला निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, असे सांगितले जाते. याचा अर्थ विकासनिधी किती द्यायचा हे पक्ष बघून ठरवले जातो. देशातील राष्ट्रपतींना गांभीर्याने दखल घ्यावी, असे हे प्रकरण आहे. निधीच्या असमान वाटपाचे प्रकरण न्यायालयातही गेले होते. इतर पक्षाचे आमदार निवडून आलेले नाहीत का? त्यांना विकासनिधी का दिला जात नाही, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

या सरकारमधल्या लोकांनी पैशांच्या जोरावर मतदार विकत घेण्याची नवी योजना आणली आहे. त्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायची आणि ते पैसे पुन्हा आपल्याकडेच खेचायचे, असे सुरू आहे. आता आमदारांना विकासकामाच्या नावाखाली देण्यात येणारे पाच कोटी रुपये पुन्हा कंत्राटदारांच्या माध्यमातून त्याच आमदारांकडे वळवले जाणार आहेत. त्यानंतर मतदारसंघातील मतदार विकत घेण्यासाठी ते पैसे वापरले जातील, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे हा विकासनिधी नसून ही लाच आहे, त्यातून विकासकामे किती होतील, हा प्रश्न आहेत. मात्र, कमीशनबाजी नक्की होणार आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या काही वर्षापासून असे प्रकार सुरू आहेत. त्याविरोधात सामुदायिकरित्या आवाज उठवावा लागणार आहे. मतदार यादीतील घोटाळ्यावर निवडणूक आयोगाविरोधात सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतली आहे. आता सर्व पक्षांचा मोर्चा निघणार आहे. त्याचपद्धतीने आता या विषयावरही एकत्रित आवाज उठवावा लागेल. विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला जाईल. त्याचप्रमाणे लोकशाही पद्धतीतील इतर आयुधांचा वापर करत या प्रश्नाला वाचा फोडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळात 800 कोटींचे अॅम्बुलन्सचे टेंडर काढले होते. या अॅम्बुलन्स रस्त्यावर आल्याच नाहीत आणि पैसे खाण्यात आले. आधीच अॅम्बुलन्सचा तुटवडा आहे. त्यात या अॅम्बुलन्स प्रत्यक्षात आल्याच नाहीत. त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. जनतेचे पैसे उडवले जात आहेत. असे असताना त्यांच्या ताफ्यात अॅम्बुलन्स आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे राष्ट्रपती उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि परराष्ट्रातून येणारे प्रमुख नेते यांच्या ताफ्यात अॅम्बुलन्स ठेवण्यात येते. हे त्यांच्यापेक्षाही मोठे आहेत काय, ताफ्यात अॅम्बलन्स ठेवण्यात येते. त्यांच्या अशा कृतीमुळे गरजूंना वेळेवर अॅम्बुलन्स आणि आरोग्यसेवा मिळत नाही आणि निरपरांधांचे बळी जात आहेत, असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
दिवाळी असल्याने फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावली आहे. तिकडे दिल्लीचा एक्यूआय 400 च्या पुढे गेला आहे तर इतरही ठिकाणी...
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर
माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती
परळची देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आदिवासी पाड्यात आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा
‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास
हिंदुस्थान S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करणार 10 हजार कोटींचा करार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी विमानांना पडण्यास झाली होती मदत