नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद, असं वक्तव्य काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट निधी देण्यात आला. पण आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहेत. या योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले. याआधी या योजनेत पारदर्शकता का नव्हती? या सरकारवर या योजनेमुळे भार पडत असल्यामुळे आता अटी शर्ती घातल्या जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना सरकार बंद करणार. आता सरकार मधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची मंजुरी आलेली नाही. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. हे सरकार सत्ताधारी आमदाराना पाच कोटी रुपयांचा निधी देतात मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार म्हणाले की, “महायुती सरकार मधील पहिल्यांदा निवडून आलेल्या ५० आमदारांना सरकारने पाच कोटीचा आमदार निधी दिला. एकीकडे आदिवासी विभाग असो किंवा मागासवर्गीय विभाग यांचा निधी वळवला जात आहे, राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. पैसे नाही सांगत सत्ताधारी आमदारांना मात्र निधीची खैरात वाटायची आणि विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय करायचे हे महायुती सरकारचे धोरण आहे. आमदार हा लोकप्रतिनिधी असल्याने हा फक्त त्यांच्यावर नाही तर जनतेवर अन्याय आहे. राज्याचा सर्वांगीण विकास होणे हे या सरकारचे धोरण नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो? Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी...
दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा
हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर