राधानगरी तालुक्यात ट्रक-दुचाकी अपघात; बहीण-भावासह चिमुकलीचा मृत्यू

राधानगरी तालुक्यात ट्रक-दुचाकी अपघात; बहीण-भावासह चिमुकलीचा मृत्यू

कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथील दत्त मंदिराजवळ दुपारी 12 वा. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरसंबळे येथील बहीण-भावासह अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. या अपघातात आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय 30, रा. तरसंबळे, ता. राधानगरी), बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे (वय 25, रा. शेंडूर, ता. कागल), कौशिकी कांबळे (वय अडीच वर्षे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अथर्व सचिन कांबळे (वय 8) हा गंभीर जखमी झाला आहे.

राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील श्रीकांत कांबळे व त्यांची बहीण दिपाली कांबळे हे दोघे भोगावती येथून दुचाकीने तरसंबळेकडे निघाले होते. कौलव येथील दत्त मंदिराजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये श्रीकांत कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिपाली कांबळे यांचा रस्त्यात उपचाराअभावी मृत्यू झाला. अपघातात अथर्व सचिन कांबळे (वय 8) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत श्रीकांत हे पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. दिपाली कांबळे यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या भावाकडे राहात होत्या. अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत
अनेकदा रात्री काम करून , प्रवास, दगदगीने झोप लागत नाही. कितीही थकवा असला तरीही झोप लागत नाही.शरीर दुखणे आणि आळस...
राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद
शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम
विकिपीडियाने ८ टक्के युजर्स गमावले; AI चा बसला फटका? जाणून घ्या काय आहे कारण