‘अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि…’, ‘बिग बॉस 17’ फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट

‘अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि…’, ‘बिग बॉस 17’ फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट

प्रसिद्ध आणि लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ तुफान चर्चेत राहिला. शो आता संपला आहे, पण तरी देखील शोमधील स्पर्धक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात फिरोझा खान म्हणजे खानजादी हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉसच्या घरात खानजादी हिची अभिनेता अभिषेक कुमार याच्यासोबत असलेली केमिस्ट्री प्रत्येकाला आवडली. पण खानजादी बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नाही… पण आता खानजादी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खानजादी हिने तिच्यासोबत घडलेल्या अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खानजादी मायानगरीत आली. पण मुंबईत आल्यानंतर अभिनेत्री कशी वागणूक मिळाली याबद्दल अभिनेत्रीने मोठा आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगितली आहे.

खानजादी म्हणाली, ‘मुंबईत आल्यानंतर आयुष्य बदलणार माहिती होतं. अनेकांनी मला सांगितलं होतं अनेक प्रवृत्तीची माणसं भेटतील. तुला भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसंच झालं… माझं अपहरण झालं… नालासोपारा येथील झोपडपट्टीत मला घेऊन गेले. त्यांनी मला जीवेमारण्याचा प्रयत्न केला. पण मी तेथून पळ काढला… मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही..’

‘अनेक वाईट गोष्टी घडल्या… पण मी माझी जिद्द सोडली नाही. मी मुंबई सोडून जाणार नाही… याच एका गोष्टीवर मी ठाम होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझा आनंद, कुटुंब, भावना सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे. मी मुंबईत आली आहे कही तरी करुन दाखवण्यासाठी…’

पुढे खानजादी म्हणाली, ‘झगमगत्या विश्वात करियर करण्यासाठी अनेक तरुण, तरुणी घर सोडण्याचा निर्णय घेतात. पण मी त्यांना सांगेल इतकं मोठं पाऊन उचलू नका…कारण प्रवास फार कठीण आहे. प्रत्येक जण कंगना रनौत आणि खानजादी नसतो… कंगना हिने फार कमी वयात घर सोडलं… मी देखील घर सोडून आली आहे.’ असं देखील खानजादी म्हणाली.

एवढंच नाहीतर, खानजादी हिने झगमगत्या विश्वात कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. खानजादी म्हणाली, ‘कास्टिंग काऊच सारख्या वाईट गोष्टीचा देखील सामना केला आहे. पण मला समजून यायचं समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे… मी छोट्या शहरातून आली आहे. पण मी मुर्ख नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खानजादी हिची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;