निवडणूक आयोगाने ठरविले, तर 48 तासांत दुबार नावे कमी होतील! – सतेज पाटील

निवडणूक आयोगाने ठरविले, तर 48 तासांत दुबार नावे कमी होतील! – सतेज पाटील

राजकीय पक्ष जर राज्यातील मतदार यादीतील दुबार नावे शोधून काढत असतील, तर निवडणूक आयोगाला ही नावे काढायला काय अडचण आहे, असा साधा सरळ सवाल उपस्थित करत, जर निवडणूक आयोगाने ठरवलेच, तर येत्या ४८ तासांत एक कोटींपेक्षा जास्त दुबार नावे कमी होतील, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

‘कोल्हापूर बॅण्ड पुरस्कार’ सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुबार मतदार असतील तर ते कोणत्या पद्धतीने काढले पाहिजेत, याबाबत इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत. पण केंद्रीय निवडणूक आयोग वेगळे सांगते, तर राज्य निवडणूक आयोग मॅन्युअल वेगळे सांगत असल्याने त्यातून संभ्रमावस्था निर्माण करण्यात येत असल्याचे सतेज पाटील यांनी निदर्शनास आणले. जर राजकीय पक्ष राज्यातील मतदार यादीतील दुबार नावे शोधून काढत असेल, तर निवडणूक आयोगाला अधिकृत नावे काढायला काय अडचण आहे? निवडणुकीत पराभूत झालेला वा निवडून आलेला उमेदवार निवडणूक आयोगाने दिलेल्या डाटावरूनच संपूर्ण माहिती काढत असतो, तर मग तुम्हाला का जमत नाही? असा सवाल उपस्थित करत, निवडणूक आयोगाने ठरवल्यास ४८ तासांत एक कोटीहून अधिक दुबार नावे मतदार यादीतून बाजूला होऊ शकतात, असा दावाही सतेज पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे मतदार बूथवरील लोड तर कमी होईलच; शिवाय यंत्रणासुद्धा कमी लागेल, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

खड्डे भरण्यासाठी ५० कोटींचा निधी द्यावा

शहरातील खराब रस्तेप्रकरणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वाधिक कर भरून, महाराष्ट्रातील तिजोरीत कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून, शहरात शंभर कोटींच्या निधीतून रस्तेसुद्धा व्यवस्थित करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातील खड्डे भरण्यासाठी शासनाने तत्काळ ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपये देऊन, त्यांचा एक माणूस खड्डे भरले की नाही ते तपासण्यासाठी पाठवावा. कारण येथे काय होते, हे कोल्हापूरला माहिती असल्याचा सूचक टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

दोन समाजांत वाद लावून जिंकण्याचा महायुतीचा डाव

भाजप आणि महायुतीकडून दोन समाजांत भांडण लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. एकीकडे ‘हैदराबाद गॅझेट’ संदर्भात जीआर काढल्यानंतर ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे म्हणायचे आणि दुसरीकडे वेगळी वक्तव्ये करायची, हा प्रकार महायुतीमधील गोंधळाची अवस्था असल्याचा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई आणि अल्काझी फाउंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डिसओबीडीयंट सब्जेक्ट्स: बॉम्बे १९३०-१९३१”...
ब्रिटिश म्युझियमच्या ‘पिंक बॉल’ मध्ये ईशा, नीता अंबानींची भारतीय संस्कृतीची झलक
Bihar election 2025 – राजदची 143 उमदेवारांची यादी जाहीर; तेजस्वी यादव राघोपूरमधून रिंगणात, तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत
दिवाळीत शेअर बाजारात तेजीची आतीषबाजी! सेन्सेक्स 84,400 च्या पार तर निफ्टी 25,900 च्या वर
शांत झोप लागण्यासाठी महिन्यातून एकदा हे करायलाच हवं, वाचा
माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन
पॅण्ट्री कर्मचाऱ्यांचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई