राहुल गांधी यांचा हल्ला; सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी
लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱयांना अशी अद्दल घडवली जाईल की पुन्हा असे करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही!
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक काsंडी करणाऱया मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला केला आहे. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱयां’वर नक्कीच कारवाई केली जाईल. सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही, ही माझी गॅरंटी, असा इशारा त्यांनी दिला.
आयकर विभागाने नोटीस बजावल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर आपली भूमिका मांडत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा समाचार घेतला. यंत्रणा इमानदारीने काम करत असत्या तर असे घडले नसते. त्यांनी विचार केला पाहिजे. कधी ना कधी भाजपचे सरकार जाणारच आहे. मग कशी कारवाई होते ते पाहाच, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. आयकर विभागाने आता नोटीस बजावली. त्याआधी काँग्रेसची चार बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे ऐन निडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक काsंडी झाली असून खर्च करता येत नसल्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List