दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही – संजय राऊत

दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यावरून फडणवीसांच्या भेटीवरून महाराष्ट्रात काही उलथापालथ होईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

”फडणवीसांच्या दिल्ली भेटीवरून महाराष्ट्रात काय उलथापालथ होणार. आता उलथापालथ नोव्हेंबर महिन्यात होईल. आम्हाला अपेक्षा आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे. जर तो न्याय मिळाला तर तो नक्कीच उलथा पालथ होईल. दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. ” ज्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज एका झटक्यात माफ केलं. ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला जीवदान दिलं. त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणनं म्हणजे स्वत: किती लाचार, लोचट आहोत हे दाखवणं. या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे ते भ्रष्ट पद्धतीने आलेलं आहे. त्यामुळे या सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायचा अधिकार नाही. आता या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार आहे. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एवढी आंदोलनं केली आहेत. जे बोलतायत त्यांचे डोळे फुटलेय किंवा कानाचे पडदे फाटलेय. हे सर्व अमित शहांच्या कंपनीचे लाचार नोकर आहेत. शिवसेना हा महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे त्यामुळे भाजपवाल्यांना त्यांची भिती वाटते” असे संजय राऊत म्हणाले.

कबुतर खान्यासंदर्भात जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”कबुतर खान्यांसंदर्भात संविधानात असं काही म्हटलंय का की कबुतर खाने बंद करू नयेत, हटवू नये? लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, लोकांना अडचणीत आणणाऱ्या, आजार निर्माण करू शकणाऱ्या आहेत त्या हटवायलाच हव्या. मरिन लाईन्सला लोढांनी एक जिमखाना बनवलाय. त्यात जे मैदान आहे तिथे करावा ना कबुतरखाना. आम्ही देऊ तिथे येऊन कबुतरांना दाणे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भुतदयावादी नेता नव्हता. उद्धव ठाकरे व बाळासाहेब यांच्यात तुम्ही भेदाभेद करू नका. उद्धव ठाकरे त्याच पक्षाचे पक्षप्रमुख आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला, गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला, गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण टोल प्लाझा परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार...
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी, सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जुन्या वादातून महाविद्यालयीन तरूणीवर भररस्त्यात अ‍ॅसिड हल्ला, आरोपी फरार
उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, SIR बाबत मोठी घोषणा होणार
युक्रेनची राजधानी कीववर रशियाच्या ड्रोन हल्ला; ३ जणांचा मृत्यू, २९ जण जखमी
नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
Latur News – बुधोडा येथे ट्रॅव्हल्स आणि सायकलचा भीषण अपघात, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू