अमिताभ आता विराट कोहलीचे शेजारी, अलिबागमध्ये 6.59 कोटींचा भूखंड खरेदी

अमिताभ आता विराट कोहलीचे शेजारी, अलिबागमध्ये 6.59 कोटींचा भूखंड खरेदी

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये 6.59 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता खरेदी केली आहे. ‘अलिबाग’ फेज 2 प्रकल्पांतर्गत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाकडून तीन भूखंड खरेदी केले. हे भूखंड एकूण 9,557 चौरस फूट आहेत. यासाठी अमिताभ यांनी 90 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क आणि 39.58 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजले आहे. याच परिसरात क्रिकेटपटू विराट कोहली यांची मालमत्ता आहे. त्यामुळे अमिताभ हे विराटचे शेजारी बनले आहेत. अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला 83 वा वाढदिवस आहे. तर अमिताभ यांनी 7 ऑक्टोबरला ही मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांनी वाढदिवसाचे हे गिफ्ट स्वतःला दिल्याचे बोलले जात आहे. अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली. अनेक चाहत्यांनी बंगल्यासमोर केक कापून वाढदिवस साजरा केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
अहिल्यानगरमध्ये राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला...
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 21 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण, 18 शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे कुर्नुलचा अपघात, पोलिसांची माहिती
दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी
Bihar Election – नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा
टायर फुटल्याने धावती एसी बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 40 प्रवासी थोडक्यात बचावले
पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?