रिक्षाचालकांकडून प्रवाशांची ‘पाकीट’ मारी, कल्याण-डोंबिवलीत मीटर बंद; लूट चालू

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची ‘पाकीट’ मारी, कल्याण-डोंबिवलीत मीटर बंद; लूट चालू

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात तब्बल २५ हजार रिक्षा आहेत. मात्र कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात रिक्षाचालक मीटरऐवजी शेअर किंवा मनाला येईल ती रक्कम घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत. २६ रुपये किमान भाडे असताना मीटर बंद असल्याचे सांगून जवळच्या अंतरासाठीही ४० रुपये आकारून ‘पाकीट’मारी करत आहेत. शिवाय शेअर रिक्षामध्ये तीन प्रवाशांची क्षमता असताना पाच प्रवासी कोंबून धोकादायक प्रवास केला जात आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून मीटर आणि प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याची सातत्याने प्रवासी मागणी करत असूनही आरटीओ दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर कार्यक्षेत्रात रिक्षांची भाडे आकारणी मीटरप्रमाणे करण्याची प्रवाशांची सातत्याने मागणी आहे. या परिसरातील सर्व मार्गांवर शेअर रिक्षांद्वारे वाहतूक केली जाते. मीटर रिक्रॅलिब्रेशननंतर रिक्षाचे किमान भाडे २३ वरून २६ रुपये झाले. याशिवाय हकीम समितीने शेअर रिक्षांच्या भाड्यात ३३ टक्के अतिरिक्त भाडेवाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त ११ टक्के टक्के भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अतिरिक्त भाडेवाढीबद्दल ग्राहक संरक्षण कक्ष, प्रवासी संघटना यांच्यासोबत समितीने चर्चा केली नाही. परिणामी भाडेवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

… अन्यथा परवाने रद्द करा!

रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे होणारी प्रवाशांची लूट लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कक्षाच्या कल्याण पूर्व कक्ष शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांनी आज कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन निवेदन दिले. जे रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. रेल्वे स्टेशन परिसरात केवळ मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षांनाच थांबा देण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले
रिल्स बनविण्याचा ट्रेण्ड जीवघेणा ठरत आहे. काहीतरी हटके करण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करत आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील एका 22 वर्षीय...
हिंदुस्थाननं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवलीय! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
Satara doctor suicide case – ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून; राहुल गांधींचा घणाघात
Dapoli News – ‘मार्केट डे’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उमटली लघुउद्योगाची जाणीव’
अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार